नववीत असताना कुसुमाग्रजांची "कणा" ही कविता अभ्यासक्रमात होती...खरतर ही कविता प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आहे.खूप साध्या शब्दात मांडलेली ही कविता...स्वाभिमान जपणं शिकवणारी...कठीण परिस्थितीतही जगण्याचे बळ देणारी...शाळेत शिकलेली ही कविता आयुष्यभरासाठी पाठ होऊन गेली कारण तिचा आशय...तिच्यातून मिळणारी प्रेरणा आणि तिचा साधेपणा !!!

तर, नव्याने संसार थाटलेल्या घरात गंगा नदीच्या पुराचे पाणी येते आणि संसार उध्वस्त होतो..होत्याचे नव्हते व्हायला काही क्षण पुरतात आणि शेवटी डोळ्यांतही आसवांचा पूर ओसंडून वाहू लागतो.अशा या परिस्थितीत त्या मुलाला मायेने आपल्यावर हात फिरवणारे,प्रसंगी धीर देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे शिक्षक आठवतात.
तो सरांना भेटून सारी कहाणी सांगतो.ते ऐकून सरांचा आपसूक पैशांची मदत करण्यासाठी खिशाकडे जाणारा हात पाहताच तो सरांना अडवतो आणि म्हणतो, "मी तुमच्याकडे आर्थिक नाही तर मानसिक मदत मागायला आलोय.एकटेपणा जाणवत होता म्हणून धीराचे दोन शब्द ऐकायला आलोय.माझा संसार जरी मोडून पडला असेल तरी माझा पाठीचा कणा (स्वाभिमान) अजूनही ताठ आहे.तुमचा आशीर्वाद फक्त द्या पुढची लढाई मी लढू शकतो." असा आशय असलेली ही कविता साऱ्यांनाच आयुष्यात प्रेरणादायी वाटते.
संवादाच्या रिसेप्शन सिद्धांता नुसार, कवितेचा अर्थ वाचणाऱ्याच्या मानसिकतेनुसार आणि त्याच्या अनुभवानुसार बदलत असतो.परंतु कुसुमाग्रजांची ही कविता मराठी माणसाच्या जवळ असण्याच कारण म्हणजे प्रत्येक मराठी मनाला ही कविता जगण्याच धैर्य देते.एक नवीन आशा निर्माण करते,वाचणाऱ्याच्या मानसिकतेनुसार तिचा प्रभाव वेगळा ठरू शकतो परंतु आशय हा बदलत नाही.आणि म्हणूनच ती साऱ्यांनाच जवळची वाटते.

तर, नव्याने संसार थाटलेल्या घरात गंगा नदीच्या पुराचे पाणी येते आणि संसार उध्वस्त होतो..होत्याचे नव्हते व्हायला काही क्षण पुरतात आणि शेवटी डोळ्यांतही आसवांचा पूर ओसंडून वाहू लागतो.अशा या परिस्थितीत त्या मुलाला मायेने आपल्यावर हात फिरवणारे,प्रसंगी धीर देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे शिक्षक आठवतात.
तो सरांना भेटून सारी कहाणी सांगतो.ते ऐकून सरांचा आपसूक पैशांची मदत करण्यासाठी खिशाकडे जाणारा हात पाहताच तो सरांना अडवतो आणि म्हणतो, "मी तुमच्याकडे आर्थिक नाही तर मानसिक मदत मागायला आलोय.एकटेपणा जाणवत होता म्हणून धीराचे दोन शब्द ऐकायला आलोय.माझा संसार जरी मोडून पडला असेल तरी माझा पाठीचा कणा (स्वाभिमान) अजूनही ताठ आहे.तुमचा आशीर्वाद फक्त द्या पुढची लढाई मी लढू शकतो." असा आशय असलेली ही कविता साऱ्यांनाच आयुष्यात प्रेरणादायी वाटते.
संवादाच्या रिसेप्शन सिद्धांता नुसार, कवितेचा अर्थ वाचणाऱ्याच्या मानसिकतेनुसार आणि त्याच्या अनुभवानुसार बदलत असतो.परंतु कुसुमाग्रजांची ही कविता मराठी माणसाच्या जवळ असण्याच कारण म्हणजे प्रत्येक मराठी मनाला ही कविता जगण्याच धैर्य देते.एक नवीन आशा निर्माण करते,वाचणाऱ्याच्या मानसिकतेनुसार तिचा प्रभाव वेगळा ठरू शकतो परंतु आशय हा बदलत नाही.आणि म्हणूनच ती साऱ्यांनाच जवळची वाटते.
अतिशय सुंदर! या कवितेचा सार फार काही सांगून जातो आणि आयुष्यभराची शिदोरी नक्कीच देऊन जातो🙏
ReplyDelete