संवाद...माणसाच्या विचारसरणी नुसार,संस्कृती नुसार,त्याच्या भौगोलिक स्थानानुसार ,समजानुसार बदलत असतो...जर्मन भाषा येत असल्याने अनेक जर्मन भाषिक लोकांशी संवाद साधता आला... पाश्चिमात्य संस्कृती,त्यांच सामाजिक जीवन,त्यांची विचारसरणी,त्यांच्या आयुष्यातील संवादाचे महत्व जाणून घेता आल.बरच शिकताही आल. एकूणच जर्मन लोक हे जरा अंतर्मुख असतात.त्यांना भारतीयानसारख २४/७ कोणत्याही विषयावर नाही बोलता येत...अर्थात ते थोडे आत्मकेंद्री देखील असतात म्हणा...पण मुळ मुद्दा हा की,'देश तसा वेश' या म्हणी नुसार प्रत्येक देशाची वागण्याची एक स्वतंत्र पद्धत असते आणि त्यांच्या बोलण्या वागण्यातून ती आपल्यापर्यंत पोहचत असते.आणि त्याचा आदर करणं,ती आहे तशी स्विकारण महत्वाच त्यातूनच परदेशी व्यक्तींशी मोकळा,आणि प्रभावी संवाद घडू शकतो...
खर तर या विदेशी लोकांशी झालेल्या संवादाचे, वैचारिक देवाणघेवाणीचे अनेक किस्से आहेत पण आज एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतोय...
पुण्यात क्रेस्ट या प्रकाशन कंपनी सोबत काम करताना तिथे माझ्या डीपार्टमेंट मध्ये एक जर्मन आणि एक नेदरलंडची अशा दोन मुली ६ महिन्यांच्या इंटरनशिप साठी आल्या होत्या.आम्ही सगळे एकाच दिवशी रुजू झाल्यामुळे आमच एकमेकांसोबत चांगल जमल.मुळातच जर्मन लोकांना भारतीय जेवण आणि कपडे,दागिने याचं आकर्षण आहे.त्यामुळे प्रत्येक शनिवार-रविवारी त्यांची आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली जायची...मग त्याविषयीची त्यांची मते,विचार अशी चर्चा रंगायची..
आमची एक शिफ्ट सकाळी ६.३० ते दुपारी २.३० अशी असायची.आणि अशाच एका सकाळी माझी जर्मन सहकारी ऑफिस मध्ये आली आणि रडूच लागली..तिला सावरलं आणि रडण्याच करणं विचारलं...तर तिने सांगितलेला प्रसंग म्हणजे भारतीय असण्याचा अभिमान बाळगणाऱ्या मला एक चपराक होती...
आदल्या वीकेंड ला ती आमच्याच ऑफिस मधल्या दुसऱ्या एका गटासोबत अलिबाग ला गेली होती पिकनिक साठी...एकतर वेळेच्या बाबतीत आग्रही असणाऱ्या जर्मन मानसिकतेला पहाटे तब्बल २ तास उशिरा बस सोडून भारतीयांनी तडा दिला होता...त्यात जर्मन लोकांचे, समुद्र किनारा म्हंटल्यावर उन्ह अंगावर घेत वाळूत पडून राहाण...वाचन करणं...वाटलच तर पोहायला जाणं हे ठरलेल समीकरण आहे.परंतु माझ्या देशबांधवाना एका फिरंगला 'आम्ही कशी मज्जा करतो पहा' हे दाखवण्यासाठी तिच्या मर्जी विरुद्ध पाण्यात पोहायला न्यायचे होते.तिने त्यांचे मन राखण्यासाठी तसे केलेही परंतु "आमच्या इतका वेळच तू पाण्यात राहिले पाहिजेस,मस्ती केली पाहिजेस" हा त्यांचा जिद्द वजा आग्रह होता...भरीस भर तिला पुरुषांकडून वाह्यात अनुभव आल्यामुळे ती पाण्यातून बाहेर आली...तर तिला सरळ "तुझ्याकडे गट सांघिकता नाही...तू माणूस म्हणून फार वाईट आहेस" असे शेरे देण्यात आले...जवळपास ४०-५० लोकांसमोर...का तर तथाकथित भारतीय मौज मजेला अनुसरून ती वागली नाही...
या साऱ्या प्रकारावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळेना...करणं मलाच प्रश्न पडले होते अनेक...कुठे आहोत आपण? काय सुरु आहे समाजात? का अशी मानसिकता होतेय? कधी सुजाण होणार आपण? जर आजचा तरुण आपल्या देशाच इतर देशांसमोर प्रतिनिधित्व करतोय तर काय अर्थ आहे "अशा "प्रतीनिधीत्वाला? "अतिथी देवो भव" असे मानणारे आपण... आपल्या देशात आलेल्या परदेशी पाहुण्यांना अशी वागणूक देऊन आपल्या संस्कृतीचे धिंदवडे काढत आहोत.." हा साध विचार ही न यावा लोकांच्या मनात...बर हे सगळ घडल कुठे तर विद्येच माहेरघर मानल जाणाऱ्या,संस्कृती जपण्याचे दाखले देणाऱ्या पुण्यामध्ये...
संवाद हा केवळ शब्दांमार्फतच नाही घडत.तो वागणुकीतून,विचारातून,देहबोलीतून देखील घडत असतो...आणि माझ्या देशबांधवांनी त्यांच्या वागणुकीतून साधलेला एका परदेशी "स्त्री" सोबतचा संवाद 'भारतात स्त्रियांना किती दुय्यम वागणूक दिली जाते.जर तुम्ही स्वतःची "पर्सनल स्पेस " जपलीत तर तुम्ही माणूस म्हणून कसे वाईट ठरता..." हेच सुचित करतो... आणि जर आपल्याकडे संवाद हा असा घडत असेल तर मग कठीण आहे सगळ...
माझ्या दुसऱ्या एका विदेशी सहकारी मैत्रिणीने तिचे भारतातले अनुभव,भारताविषयीचे विचार यांना आपल्या ब्लॉगद्वारे वाट मोकळी करून दिली आहे.
http://doriend.tumblr.com/
मी नेमाने तिचा ब्लॉग वाचत आलेय.आम्ही बरेचदा त्यावर चर्चा देखील केलेय.तिने त्यात भारताविषयी...भारतीयांविषयी जे लिहिलंय ते वाचून मला तिचा राग नाही आला कधी...अर्थात मी तिला प्रोत्साहन देखील नाही दिल तिच्या लिखाणाविषयी...पण त्याने मला अंतर्मुख केल...विचार करायला भाग पाडलं...माणूस म्हणून जगताना,भारतीय म्हणून जगताना...आपण आपल्या देशाच्या असंख्य चांगल्या,अभिमान वाटावा अश्या बाजू जगापर्यंत पोहचवायच्या...त्यांना भारतातील चांगल्या आठवणी देऊ करायच्या की भारताची,"आपल्या देशाची" चुकीची प्रतिमा संवादित करायची हे आपणच ठरविले पाहिजे...ती आपली नैतिक जबाबदारी असली पाहिजे...या उपरे बोलणे नाही!!!
खर तर या विदेशी लोकांशी झालेल्या संवादाचे, वैचारिक देवाणघेवाणीचे अनेक किस्से आहेत पण आज एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतोय...
पुण्यात क्रेस्ट या प्रकाशन कंपनी सोबत काम करताना तिथे माझ्या डीपार्टमेंट मध्ये एक जर्मन आणि एक नेदरलंडची अशा दोन मुली ६ महिन्यांच्या इंटरनशिप साठी आल्या होत्या.आम्ही सगळे एकाच दिवशी रुजू झाल्यामुळे आमच एकमेकांसोबत चांगल जमल.मुळातच जर्मन लोकांना भारतीय जेवण आणि कपडे,दागिने याचं आकर्षण आहे.त्यामुळे प्रत्येक शनिवार-रविवारी त्यांची आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली जायची...मग त्याविषयीची त्यांची मते,विचार अशी चर्चा रंगायची..
आमची एक शिफ्ट सकाळी ६.३० ते दुपारी २.३० अशी असायची.आणि अशाच एका सकाळी माझी जर्मन सहकारी ऑफिस मध्ये आली आणि रडूच लागली..तिला सावरलं आणि रडण्याच करणं विचारलं...तर तिने सांगितलेला प्रसंग म्हणजे भारतीय असण्याचा अभिमान बाळगणाऱ्या मला एक चपराक होती...
आदल्या वीकेंड ला ती आमच्याच ऑफिस मधल्या दुसऱ्या एका गटासोबत अलिबाग ला गेली होती पिकनिक साठी...एकतर वेळेच्या बाबतीत आग्रही असणाऱ्या जर्मन मानसिकतेला पहाटे तब्बल २ तास उशिरा बस सोडून भारतीयांनी तडा दिला होता...त्यात जर्मन लोकांचे, समुद्र किनारा म्हंटल्यावर उन्ह अंगावर घेत वाळूत पडून राहाण...वाचन करणं...वाटलच तर पोहायला जाणं हे ठरलेल समीकरण आहे.परंतु माझ्या देशबांधवाना एका फिरंगला 'आम्ही कशी मज्जा करतो पहा' हे दाखवण्यासाठी तिच्या मर्जी विरुद्ध पाण्यात पोहायला न्यायचे होते.तिने त्यांचे मन राखण्यासाठी तसे केलेही परंतु "आमच्या इतका वेळच तू पाण्यात राहिले पाहिजेस,मस्ती केली पाहिजेस" हा त्यांचा जिद्द वजा आग्रह होता...भरीस भर तिला पुरुषांकडून वाह्यात अनुभव आल्यामुळे ती पाण्यातून बाहेर आली...तर तिला सरळ "तुझ्याकडे गट सांघिकता नाही...तू माणूस म्हणून फार वाईट आहेस" असे शेरे देण्यात आले...जवळपास ४०-५० लोकांसमोर...का तर तथाकथित भारतीय मौज मजेला अनुसरून ती वागली नाही...
या साऱ्या प्रकारावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळेना...करणं मलाच प्रश्न पडले होते अनेक...कुठे आहोत आपण? काय सुरु आहे समाजात? का अशी मानसिकता होतेय? कधी सुजाण होणार आपण? जर आजचा तरुण आपल्या देशाच इतर देशांसमोर प्रतिनिधित्व करतोय तर काय अर्थ आहे "अशा "प्रतीनिधीत्वाला? "अतिथी देवो भव" असे मानणारे आपण... आपल्या देशात आलेल्या परदेशी पाहुण्यांना अशी वागणूक देऊन आपल्या संस्कृतीचे धिंदवडे काढत आहोत.." हा साध विचार ही न यावा लोकांच्या मनात...बर हे सगळ घडल कुठे तर विद्येच माहेरघर मानल जाणाऱ्या,संस्कृती जपण्याचे दाखले देणाऱ्या पुण्यामध्ये...
संवाद हा केवळ शब्दांमार्फतच नाही घडत.तो वागणुकीतून,विचारातून,देहबोलीतून देखील घडत असतो...आणि माझ्या देशबांधवांनी त्यांच्या वागणुकीतून साधलेला एका परदेशी "स्त्री" सोबतचा संवाद 'भारतात स्त्रियांना किती दुय्यम वागणूक दिली जाते.जर तुम्ही स्वतःची "पर्सनल स्पेस " जपलीत तर तुम्ही माणूस म्हणून कसे वाईट ठरता..." हेच सुचित करतो... आणि जर आपल्याकडे संवाद हा असा घडत असेल तर मग कठीण आहे सगळ...
माझ्या दुसऱ्या एका विदेशी सहकारी मैत्रिणीने तिचे भारतातले अनुभव,भारताविषयीचे विचार यांना आपल्या ब्लॉगद्वारे वाट मोकळी करून दिली आहे.
http://doriend.tumblr.com/
मी नेमाने तिचा ब्लॉग वाचत आलेय.आम्ही बरेचदा त्यावर चर्चा देखील केलेय.तिने त्यात भारताविषयी...भारतीयांविषयी जे लिहिलंय ते वाचून मला तिचा राग नाही आला कधी...अर्थात मी तिला प्रोत्साहन देखील नाही दिल तिच्या लिखाणाविषयी...पण त्याने मला अंतर्मुख केल...विचार करायला भाग पाडलं...माणूस म्हणून जगताना,भारतीय म्हणून जगताना...आपण आपल्या देशाच्या असंख्य चांगल्या,अभिमान वाटावा अश्या बाजू जगापर्यंत पोहचवायच्या...त्यांना भारतातील चांगल्या आठवणी देऊ करायच्या की भारताची,"आपल्या देशाची" चुकीची प्रतिमा संवादित करायची हे आपणच ठरविले पाहिजे...ती आपली नैतिक जबाबदारी असली पाहिजे...या उपरे बोलणे नाही!!!
No comments:
Post a Comment